नापिकीमुळे शेतकऱ्याने घेतला गळफास

◆ बोटोणी येथील शेतकऱ्याने स्वगृही केली इहलोकाची यात्रा

बोटोणी : सुनील उताणे

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील शेतकऱ्याने नापिकीमुळे गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज गुरुवारला दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

कवडू नेहारे (६०) असे गळफास घेऊन इहलोकाची यात्रा केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव आहे.यंदा अतिवृष्ठीने हातचे पीक नेस्तनाबूत झाले.उत्पादनातील प्रचंड घटीने आगामी काळातील कुटुंबाचा गाडा कसा हाकावा व शिरावर असलेल्या खासगी कर्जाने मागील काही दिवसांपासून त्यांच्यात अस्वस्थता होती.विचारांच्या असह्य वेदनेने आज दुपारी त्यांनी स्वतःचे निवासी गळफास घेत जीवनाचा अखेर केला.

मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले व एक मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment